आनंदीबाई जोशी यांच्या १५३व्या जयंतीनिमित्त गुगलने एक डूडल बनवले होते जे पाहून आपल्यापैकी बर्याच लोकांना आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल माहिती मिळाली. त्यांच्या जीवनावर आधारित एक मालिकाही दूरदर्शनने प्रसारित केली होती. एक मराठी चित्रपट देखील आहे. दुसरीकडे महाराष्ट्र सरकार त्यांच्या नावाने आरोग्याशी संबंधित फेलोशिप प्रोग्राम चालवत आहे. हे सर्व सन्मान आनंदी गोपाळ जोशी यांचा वारसा आणि महत्त्व दर्शवतात. पाश्चात्य वैद्यकशास्त्रात पदवी मिळवणारी ती पहिली भारतीय महिला मानली जाते. आज आपण आपल्या या विशेष लेखामद्धे त्यांच्या आयुष्यातील प्रवासावर प्रकाश टाकू.
आनंदीबाई जोशी यांचा जन्म 1865 मध्ये कल्याण मधील मराठी जमीनदाराच्या कुटुंबात झाला. वयाच्या 9 व्या वर्षी तिचा विवाह झाला. आनंदी यांच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठे असलेले त्यांचे पती गोपाळराव जोशी हे अतिशय पुरोगामी विचारसरणीचे होते. त्यांची विचारसरणी आणि पाठबळ यामुळेच वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाणारी भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान आनंदीबाईला मिळाला.
स्वातंत्र्यापूर्वी, भारतात प्रत्येकाला योग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हती, ज्याचा फटका आनंदीबाई जोशी यांना सहन करावा लागला. त्यांच्या 10 महिन्यांच्या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. त्यावेळी आनंदी अवघ्या 14 वर्षांच्या होत्या आणि त्यांना अपार वेदना सहन कराव्या लागल्या होत्या.
डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचे ठरवले : 1883 मध्ये कल्याण, अलिबाग आणि कोल्हापूर या शहरांमध्ये टपाल लिपिक म्हणून काम केल्यानंतर आनंदीबाईचे पती गोपाळरावांची पश्चिम बंगालमधील सेरामपूर येथे बदली झाली. त्यानंतर, आनंदीबाई अमेरिकेला गेल्या. त्यांनी जगातील पहिल्या महिला वैद्यकीय महाविद्यालय, पेनसिल्व्हेनिया मेडिकल कॉलेज (फिलाडेल्फिया) च्या अधीक्षकांना एक हृदयस्पर्शी पत्र लिहिले. काही काळानंतर आनंदीबाई यांनी त्याच महाविद्यालयात प्रवेश घेतला. कलकत्त्यात, न्यूयॉर्कला जाण्यापूर्वी, आनंदी यांनी सेरामपूर कॉलेजच्या हॉलमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले आणि वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाण्याच्या त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले.
अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात आणि सभेत बोलताना आनंदीबाई यांनी आपल्याला वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी परदेशात का जायचे होते याची अनेक कारणे तपशीलवार वर्णन केली. त्यांच्या या निर्णयाने समाज त्यांच्या विरोधात आला होता. त्यांना आणि त्यांच्या पतीला समाजाकडून खूप त्रास सहन करावा लागला. लोक त्यांच्या निर्णयाला सामाजिक कलंक म्हणत होते. त्यावर उत्तर देताना आनंदी म्हणाल्या की, मला महिला डॉक्टर बनून लोकांची सेवा करायची आहे.
नाकारला ख्रिश्चन धर्म : 19व्या शतकात भारतात वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महिलांना स्थान नव्हते. महिलांनी केवळ घरकाम करणारी व्यक्ती म्हणून काम करणे अपेक्षित होते. चेन्नईत डॉक्टरेटचा कोर्स असला तरी. पण तिथे काम करणाऱ्या पुरुष शिक्षकांची परंपरावादी विचारसरणी महिलांना शिक्षण घेऊ देत नव्हती. स्त्रीला विद्यार्थिनी म्हणून पाहणे ही कल्पना देखील कोणी केली नव्हती आणि या विचाराने त्या काळात देशातील महिलांसाठी आवश्यक आरोग्य सेवेपर्यंतचा प्रवेश मर्यादित केला. त्यावेळी देशात एकही महिला डॉक्टर नसल्याने त्यांची कमतरता प्रदीर्घ काळ कायम होती.
आता परत 1880 कडे वळू. त्यावेळी गोपाळराव यांनी रॉयल वाइल्डर या प्रख्यात अमेरिकन मिशनरीला पत्र पाठवले. ज्यामध्ये त्याने आनंदीच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी मदत करण्यासोबतच स्वत:साठी रोजगाराच्या संधीची विनंती केली होती. वाइल्डरने त्यांच्या पत्राला उत्तर दिले की ते एका अटीवर सहमत आहेत – जोशींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला पाहिजे. या हिंदू दाम्पत्याने त्यांच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याणे त्यांना भारतात बरेच फायदे मिळू शकतात हे माहीत असून देखील त्यांनी विरोध केला.
सहन केल्या लोकांच्या टीका : 1883 मध्ये आनंदीबाई अमेरिकेला जाणार असल्याची बातमी पसरली. तेव्हापासून या जोडप्याला सर्व समाजातील लोक त्रास देत होते. खरे तर, महासागर पार करून दुसऱ्या देशात जाणे हे त्या काळी उच्च जातींमध्ये पाप मानले जात असे. लोकांनी त्यांच्यावर बेछूट टिप्पणी केली, त्यांच्या घरावर दगड आणि शेण फेकले. गोपाळराव ज्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करायचे, तिथेही गदारोळ झाला. पण आनंदीबाई आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या.
दृढनिश्चय : भले, वाइल्डरने आनंदीबाईला अमेरिकन मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत केली नाही. परंतु त्यांनी त्यांचा पत्रव्यवहार मिशनरी रिव्ह्यू, प्रिन्स्टन विद्यापीठाच्या वर्तमान जर्नलमध्ये प्रकाशित केला. न्यू जर्सी येथील थिओडिसिया या महिलेने वर्तमानपत्रात ते वाचले आणि ती आनंदीला मदत करण्यासाठी पुढे आली. 1980 मध्ये त्यांनी आनंदी यांना पत्र लिहून त्यांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांना शक्य ते सर्व सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.
आनंदीबाईंनी न्यूयॉर्कमध्ये पाऊल ठेवल्यापासून, थिओडिसिया तीन वर्षे आनंदीबाई यांच्यासोबत राहिली. त्यांचा परस्पर स्नेह इतका खोल होता की थिओडिसियाने सर्व काही मागे टाकून आपला दृढनिश्चय पूर्ण करण्यासाठी निघालेल्या भारतीय स्त्रीला घर देण्याची ऑफरही दिली.
पेनसिल्व्हेनियाच्या वुमेन्स मेडिकल कॉलेजच्या अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात आनंदी यांनी लिहिले की, “माझ्या मित्रांचा आणि समजाच्या लोकांचा प्रचंड विरोध असूनही, माझ्या दृढनिश्चयाने मला तुमच्या देशात आणले आहे. ज्या उद्देशासाठी मी इथे आले आहे, तो उद्देश पूर्ण करण्यासाठी मला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. देशातील गरीब पीडित महिलांना वैद्यकीय मदत देणे हे माझे ध्येय आहे ज्यांना त्याची नितांत गरज आहे. कारण पुरुष डॉक्टरांकडून उपचार करण्यापेक्षा ती मरणे पसंत करते.”
आनंदी यांनी इंग्रजी, अंकगणित आणि इतिहासाचा अभ्यास करणे आणि सात भाषा बोलणे ही तिची खासियत सांगितली आणि लिहिलं, “मानवतेचा आवाज माझ्या पाठीशी आहे आणि मी अपयशी होऊ इच्छित नाही. जे स्वतःला मदत करू शकत नाहीत त्यांना मदत करण्यासाठी माझा आत्मा मला नेहमीच प्रेरणा देईल.”
पाश्चात्य वैद्यकशास्त्रात पदवी मिळवणारी पहिली महिला : या टप्प्यावर पोहोचण्यासाठी आनंदीला आलेल्या अडचणींमुळे प्रेरित होऊन, कॉलेजच्या डीन रॅचेल बोडलेने तिला कॉलेजमध्ये शिकण्याची परवानगी दिली. यावेळी, त्यांना दरमहा $600 शिष्यवृत्ती देखील देण्यात आली. आनंदी यांनी “आर्यन हिंदूंमध्ये प्रसूतीतज्ञ (मिडवाईफ)” या विषयावर थिसेस लिहिला आणि तीन वर्षांत त्यांनी एमडी पदवी पूर्ण केली.
आनंदीबाई सोबत केई ओकामी आणि तबत इस्लामबूली नावाच्या इतर दोन महिला होत्या, ज्यांनी पदवी प्राप्त केली आणि तिघीही अनुक्रमे भारत, जपान आणि सीरियामध्ये पाश्चात्य औषधांमध्ये पदवी मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
11 मार्च 1886 रोजी पदवीदान समारंभात आनंदी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कॉलेजचे अध्यक्ष म्हणाले, “मला सांगायला अभिमान वाटतो की आजचा दिवस कॉलेजच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. या महाविद्यालयात वैद्यकशास्त्राची पदवी मिळवून गौरवाची अनुभूती देणारी आमच्याकडे पहिली भारतीय महिला आहे. भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा तिला अभिमान मिळाला आहे.
आनंदीबाई जोशी यांना राणी व्हिक्टोरियाकडून देखील अभिनंदनाचा संदेश मिळाला. कॉलेजच्या डीनने राणी व्हिक्टोरिया यांना आनंदीच्या यशाबद्दल माहिती दिली होती. भारतात परतल्यावर, 21 वर्षीय आनंदीला कोल्हापूरच्या संस्थानाने अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलच्या महिला वॉर्डच्या प्रभारी डॉक्टर म्हणून नियुक्त केले.