कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून झीरो वेस्ट संकल्पनेच्या प्रयोगाची यशोगाथा

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

कचरा आणि त्याचे व्यवस्थापन हा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात कळीचा मुद्दा बनला आहे. कित्येक देशांमध्ये तर कचरा ही मोठी समस्या बनली आहे, कारण जर कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे झाले नाही, तर पर्यावरण आणि आरोग्य विषयक अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ येऊ शकते. कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक देशाच्या सरकारला लोकांच्या सहभागाची अपेक्षा असते, आणि ती अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तर सरकारचे प्रयत्न अपुरे पडतात.

मात्र भारतामध्ये एक राज्य असे आहे ज्याने सरकार आणि लोक सहभागातून साकार केला आहे कचरा व्यवस्थापनाचा आदर्श वस्तुपाठ.

केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरमने शहरातील कचऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विकेंद्रित कचरा व्यवस्थापन हा किती आदर्श उपाय आहे ते दाखवून दिले आहे.

२०११ मध्ये स्थानिकांच्या विरोधानंतर तिरुवनंतपुरम शहराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. साइटवरील कचऱ्याच्या गैरव्यवस्थापनाचे आरोप झाले, ज्यामुळे विलापिसलाला येथील एकमेव म्युनिसिपल लँडफिल बंद करण्यास भाग पाडले गेले होते.

सार्वजनिक दबावाचा सामना करत तिरुवनंतपुरम महानगरपालिकेने, जी शहराचे प्रशासन करते, कचरा व्यवस्थापनासाठी विकेंद्रित प्रणाली सुरू केली.

कचरा व्यवस्थापनाच्या या मॉडेलने तिरुवनंतपुरम शहराला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे आणि अंमलबजावणीची आव्हाने, प्राधान्यक्रमांचे राजकारण आणि शून्य कचऱ्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी विविध भागधारकांच्या भूमिका समजून घेण्याचा एक उत्कृष्ट मार्ग सिद्ध झाला आहे.

अंदाजे ०.९ दशलक्ष लोकसंख्या असलेले तिरुवनंतपुरम शहर २१४.८६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले आणि १०० प्रभागांमध्ये विभागलेले आहे.

२०१०-११ मध्ये शहरात २५० टन घनकचरा निर्माण झाला होता. २०११ च्या स्थानिकांच्या विरोधानंतर तिरुवनंतपुरम महानगरपालिकेने जास्तीत जास्त कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी कचऱ्याचे विलगीकरण करण्यास सुरुवात केली.

तिरुवनंतपुरम शहरातील कचरा व्यवस्थापनाची संपूर्ण प्रक्रिया आतां स्व-प्रेरित तत्त्वावर आधारित आहे ज्यामुळे कचऱ्याचे कमीत कमी प्रमाणात विस्थापन होते. व्यावसायिक आस्थापनांनी त्यांच्या कचऱ्याची जबाबदारी स्वतः घेणे अपेक्षित आहे.

व्यावसायिक आस्थापनांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, व्यावसायिक प्रतिष्ठान, कम्युनिटी हॉल आणि संस्थांचा समावेश होतो. निवासी सदनिका आणि गेटेड समुदायांसाठी, टीएमसीने सेंद्रिय कचरा व्यवस्थापनासाठी ५० टक्के अनुदान देऊ केले आहे.

टीएमसी अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार सध्या १,२५,००० कुटुंबे (शहरातील १०० वॉर्डातील एकूण घरांपैकी ५० टक्के) तसेच ३५० बल्क जनरेटर त्यांचा ओला कचरा कंपोस्ट करतात. जवळपास १०० बल्क जनरेटर आणि ४००० कुटुंबांनी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोगॅस संयंत्रे उभारली आहेत. हे बायोगॅस प्रकल्प शून्य किंमतीत घराघरांत लावण्यात आली आहेत. पाईप, किचन-बिन आणि जैव कंपोस्टिंग हे घरगुती कंपोस्टिंगसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान आहे.

नागरी संस्थेने सुरू केलेली अँटी-लिटरिंग एन्फोर्समेंट टीम (ॲलर्ट) नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी किंवा घराबाहेर कचरा टाकू नये म्हणून लक्ष ठेवत आहे. महामंडळाच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या गस्ती पथकाच्या दक्ष नजरेखाली ही टीम २४ तास कार्यरत असते.

रात्रीच्या वेळी कचरा टाकण्याच्या घटना समोर आल्यास पथकाला सतर्क करण्याचा अधिकारही जनतेला देण्यात आला आहे. स्मार्ट त्रिवेंद्रम ॲप्लिकेशनद्वारे घनकचरा व्यवस्थापन (एसडब्ल्यूएम) सेवा वितरणाची माहितीही नागरिकांना उपलब्ध करून दिली जाते.

तिरुवनंतपुरम शहराने कचरा व्यवस्थापनाचा आदर्श वस्तुपाठ घालून दिलेला आहे. आतां गरज आहे भारतातील इतर राज्यांनी पुढाकार घेऊन कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा